औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी नदीम राणा यांच्यावर दौलताबाद येते जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
नदीम राणा यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी धार्मिक मतावर निवडणूक लढवल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांनी जलील यांच्याविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यामुळे माझ्यावर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप नदीम राणा यांनी केला आहे.