नागपूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज नागपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पुन्हा एकदा किमान वेतन योजनेच्या मुद्द्याला हात घातला. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला १५ लाख रुपये देण्याचं फसवं आवाहन दिलं होतं मात्र आम्ही दिलेलं किमान वेतन योजनेचं आवाहन आम्ही कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करू. मी माझं ध्येय निश्चित केलं असून देशातील सर्वाधिक गरीब २०% जनतेला महिना ६ हजार म्हणजेच वार्षिक ७२ हजार देणं हेच माझं ध्येय आहे. या हिशोबाने मी देशातील सर्वाधिक गरिबांना किमान वेतन योजनेद्वारे ५ वर्षात ३ लाख ६० हजार रुपये देणार आहे.”
तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी आज सकाळीच केरळ येथील वायनाड येथून लोकसभा उमेदवारीचा अर्ज भरला असून यानंतर त्यांनी तेथे रोड-शो द्वारे शक्तिप्रदर्शन देखील केले होते.
Congress President Rahul Gandhi in Nagpur: Congress party is about to do a surgical strike on poverty, Narendra Modi ji had promised Rs 15 lakh. Rs 72,000 annually implies, Rs 3,60,000 in 5 years. No matter what, I don't care, my aim is clear. #Maharashtra pic.twitter.com/02r1SinwSI
— ANI (@ANI) April 4, 2019