नवी दिल्ली – रावळपिंडी एक्सप्रेस अशी ओळख असणारा पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज क्रिकेटपटू ‘शोएब अख्तर’ने त्याच्या कारकिर्दीत ताशी 161 किलोमीटर वेगाने गोलंदाजी केली आहे. आणि त्याचा हा विक्रम अद्याप कोणीही मोडू शकलेले नाही. म्हणूनच त्याचे उदाहरण क्रिकेटविश्वातील नवोदित वेगवान गोलंदाजांना दिले जाते ज्यांना वेगवान गोलंदाजीची कला शिकायची आहे. अश्याच सगळ्याच खेळाडूंना ‘शोएब अख्तर’चे उदाहरण देण्यात येत.
दरम्यान, नेहमीच आपल्या वेगवान गोलंदाजाने चर्चेत असणाऱ्या ‘शोएब अख्तर’ने नुकताच एक मोठा खुलासा केला असून, त्याच्या विधानामुळे एकच खळबळ उडाली असल्याचं दिसून येते आहे. अलीकडेच आशिया चषकाबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी भारताच्या पाकिस्तानात न येण्याच्या निर्णयाबाबत आयसीसीच्या पुढील बैठकीत हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे वक्तव्य केले होते.
आणि आता हाच धागा पकडून ‘आशिया कप खेळण्यासाठी भारतीय संघाने पाकिस्तानात यावे’, असे ‘शोएब अख्तर’ने म्हटले. यंदाचा आशिया चषक पाकिस्तानात व्हावा आणि भारत-पाक संघ अंतिम फेरीत भिडावेत, अशी माझी इच्छा आहे. असं तो म्हणाला.
शोएब अख्तर पुढे म्हणाला की, ‘मी दिल्लीत येत राहतो. माझे आधार कार्ड बनले आहे, बाकी काही राहिले नाही. मला भारतात खेळण्याची खूप आठवण येते. भारताने मला अपार प्रेम दिले आहे. त्यामुळे यंदाचा आशिया चषक पाकिस्तानात व्हावा आणि भारत-पाक संघ अंतिम फेरीत भिडावेत, अशी माझी इच्छा आहे. असं विधान ‘शोएब अख्तर’ने केलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल खुलासा केला आहे.