मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ‘सुषमा अंधारे’ हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. शिवसेनेच्या नेत्या म्हणून त्यांनी आपल्या वकृत्वातून राजकीय नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. त्यांच्या भाषणांना मुळे शिवसेनेला एका नवीन चेहरा मिळाला असल्याची भावना व्यक्त केली जाता आहे. दरम्यान, आपल्या व्यक्तव्यामुळे सतत चर्चेत असणाऱ्या सुषमा अंधारेंवर मनसे कडून घणाघाती टीका करण्यात आली आहे. यावेळी त्यांची मिमिक्री करत त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सुषमा अंधारेंच्या स्वरात “माझ्या दादाहो-ताईहो, मला तुम्हाला विचारायचंय…’, हे वाक्य म्हटलं अन् उपस्थितांनी त्याला चांगलीच दाद दिली. यावेळी संदीप देशपांडे म्हणाले, “माझ्या दादाहो-ताईहो, आम्हाला तुम्हाला विचारायचंय… आम्ही भरत असलेल्या टॅक्सचा आम्हाला काय मोबदला मिळाला? ताईहो… तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आणखी कुणावर केली पण आमचं काय?’, असा सवाल संदीप देशपांडेंनी केलाय.
तसेच यावेळी त्यांनी माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे. मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आहे. अशात मनसेही आक्रमकपद्धतीने मैदानात उतरली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे आणि पक्षातील इतर नेते आक्रमक पणे आपली भूमिका मांडत असल्याचं दिसून येत आहे.