लखनौ – उत्तर प्रदेशात दलित, ब्राह्मणांबरोबरच मुस्लिमांनाही लक्ष्य केले जात असल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी केला आहे.
राज्यात अलीकडेच डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचाही प्रकार घडला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारने उपाययोजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आपल्या ट्विटर संदेशात त्यांनी म्हटले आहे की, समाजवादी पक्षाच्या काळात दलित आणि ब्राह्मणांवर जातीय द्वेषातून त्यांना दाबून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. आता भाजपच्या राज्यात या दोन वर्गांबरोबरच मुस्लिमांनाही लक्ष्य केले जात आहे. त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवले जात असून हा दुख:द प्रकार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
दलित नेत्यांची विविध संस्थांना देण्यात आलेली नावे मुद्दाम बदलली जात आहेत. अनेक जिल्ह्यांची नावेही खोडसाळपणे बदलली जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.