पुणे – शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामधील औराद गावात एकाचा खून करून पुण्यात आलेल्या दोघांना पाषाण सुस रोडवर सापळा रचून शुक्रवारी पहाटे गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने बेड्या ठोकल्या. श्री मंगेश चाैधरी (वय.20), सागर प्रकाश ढोकणे (वय.19, राहणार दोघेही कर्वेनगर) अशी दोघांची नावे आहेत.
शेतीच्या वाटणीच्या कारणातून झालेल्या भांडणात व वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पुतण्या अक्षय शेषेराव दुधभाते याने त्याच्या राहत्या गावातील दोन व्यक्ती व श्री आणि सागर यांच्या साथीने चुलता दिगंबर दुधभाते (वय.40,रा. औराद, ता. उमरगा) यांना लाथाबुक्यासह काठीने गंभीर मारहाण करून खून केला होता.