रवींद्र कदम
कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनांची प्रतीक्षा : घनकचरा व्यवस्थापन विभागाचे दुर्लक्ष
नगर – शहरात इतरत्र कचरा पडल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे नागरिकांमधून, नगरसेवक, महापौर, आमदार यांसह महापालिका प्रशासना कडून सफाई कर्मचाऱ्यांना दोषी ठरविले जाते. मात्र, या कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांना कुठलेच सुरक्षा साधने दिले जात नसल्याचे कर्मचाऱ्यांमधून सांगण्यात आले असून, आमच्याकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नगर शहराचा विस्तार झपाट्याने होत असून मनपा हद्दीत दररोज 120 ते 130 टन कचरा निघत आहेत. हा कचरा इतरत्र पडल्यास नागरिकांकडून स्वच्छेतेबाबात अनेक तक्रारींचा भडीमार होतो. अनेकदा तर नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आंदोलने करत शहरातील कचरा लवकरात लवकर उचलला जावा.
मात्र हा कचरा उचलनारे कर्मचारी हे नागरिकच असून त्यांनाही आरोग्याची भीती नसेल का असा प्रश्न मात्र कुणाला पडला नाही. व त्यांना सुरक्षा साधणे का दिली नसावीत. अनेक कर्मचारी हा कचरा हातानेच उचलून कुंड्यामध्ये, वाहनामध्ये टाकत असल्याचे निदर्शनास येत आहे.
महानगरपालिकेत अंदाजे 600 ते 650 सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांवर नगर शहरातील साडेचार लाख नागरिकांचे आरोग्याची जबाबदारी आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी नगरकरांची मुख्यता प्रशासनाची नाही का असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेचा घनकचरा विभाग या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा साधनाची पूर्तता करतो का? त्यासाठी किती निधी खर्च करतो. या कर्मचाऱ्यांना वर्षातून, सहा महिन्यातून साहित्याचे वाटप होते का? याबाबत मात्र अधिकारी, पदाधिकारी मात्र अलबेल असल्याचे दिसत आहे.
मात्र, महापालिकेकडून स्वच्छता सर्वेक्षणाबाबत जनजागृती व प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमाचा डांगोर पिटविला जातो. दरम्यान पालिकेने स्वच्छतेबाबत शहरातील कचरा संकलनासाठी पुणे येथील स्वयंभू ट्रान्सपोर्टला तीन वर्षासाठी कचरा संकलनाचा ठेका दिला आहे. त्यासाठी मनपा 1 हजार 650 रुपये मोजत आहे. त्याच धरतीवर मनपाने सफाई कर्माचाऱ्यांना गम बुट. मस्क, हात मोजे तसेच अंगात परिधान करण्यासाठी सुरक्षा साधने ही उपलब्ध करून द्यावेत. व ते उपकरणे कर्मचाऱ्यांना सक्तीचे करावेत. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येणार नाही.
आयुक्त, महापौर, आमदार यांनी लक्ष देण्याची गरज
शहरात कुठेही काही समस्या झाल्यास नगरसेवक, महापौर व आमदार यांच्याकडून समस्यांची सोडवणूक करून त्यावर मार्ग काढला जातो. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही त्यांनी तत्परता दाखावी. व त्यांना सुरक्षा साधने मिळून देण्यास प्रयत्न करावे अशी भावना कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.