नगर -गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाऊन मुळे शहरातील बाजारपेठ बंद आहे. मात्र, आता व्यवसायाला परवानगी द्यावी या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांनी आयुक्तांसह शहरातील व्यापाऱ्यांची बैठक घेतली. याबाबत व्यापाऱ्यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. या निर्णयावर लवकरच निर्णय घेतला जाईल अशी, अपेक्षा व्यापाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, गेल्या दोन महिन्यापासून करानामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा दंडाधिकारी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या आदेशानुसार दोन महिन्यापासून आजपर्यंत आमचे उद्योग व्यवसाय बंद आहेत. राज्यातील काही जिल्ह्यात रेड झोन असुनसुद्धा तेथे उद्योग व्यवसायास (दि.20) पासून परवानगी देण्यात आली आहे.
शहरातील कापडबाजार, रेडीमेड, सोने-चांदीचे शोरुम, भांडी, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक, फर्निचर, स्टेशनरी, कटलरो, आंबे फळ फळावर इत्यादी सर्व प्रकारची उद्योग व्यवसाय आहेत. हे व्यवसाय आता बंद ठेवणे सर्वदृष्टीने अवघड झाल असून, याचा विपरीत परिणाम नगर शहराच्या आर्थिक परिस्थितीवर होणार आहे. त्याचप्रमाणे या मार्केटमधील असलेले शेकडो सेल्मन, कर्मचारी यांचेसुध्दा घरी असून आर्थिक उन्नती थांबली आहे.
प्रशासनाने आता अटी व शर्तीचा अवलंब करुन आजपासून आमचे उद्योग व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी अहमदनगर होलसेल फुटवेअर मर्चंटस् असोसिएशन, अहमदनगर सराफ सुवर्णकार संघटना, माणिक चौक व्यापारी संघटना, महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशन, नवीपेठ, अर्बन बॅंक रोड, शहाजीरोड व्यापारी महासंघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.