आबूधाबी – आयपीएल स्पर्धेत आज बलाढ्य मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होत आहे. मुंबईच्या तगड्या फलंदाजीमुळे त्यांचेच पारडे जड राहण्याची शक्यता आहे. पॉवर हिटिंगच्या स्पर्धेत मुंबईची बाजू काहीशी वरचढ आहे. त्यामुळे त्यांच्या फलंदाजांना रोखण्याचे मोठे आव्हान राजस्थानसमोर राहणार आहे.
मुंबई विरूध्द राजस्थान यांच्यातील सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा(टाॅस) कौल हा मुंबई इंडियन्सच्या बाजूनं लागला आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
#MumbaiIndians have won the toss and they will bat first in Match 20 of #Dream11IPL against #RR.#MIvRR pic.twitter.com/j4ReGoduw3
— IndianPremierLeague (@IPL) October 6, 2020
दरम्यान,यंदाच्या स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाबच्या पाठोपाठ मुंबईचीच फलंदाजी जास्त सशक्त आहे. त्यांच्याकडे पॉवर हिटर्स फलंदाज अन्य संघांपेक्षा जास्त असल्याने त्यांनी सातत्याने प्रतिस्पर्धी संघांवर दडपण राखले आहे. अन्य संघांच्या तुलनेत राजस्थानची गोलंदाजी यंदाच्या स्पर्धेत फारशी सरस झालेली नाही. त्यामुळे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, कॅरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, इशान किशन व सौरभ तिवारी यांना कसे रोखायचे हा मोठा प्रश्न राजस्थनसमोर निर्माण झाला आहे.