मुंबई – फेडरेशन कप राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या ऐश्वर्या मिश्राने दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. तिने महिला 400 मीटर शर्यतीत विक्रमी कामगिरीसह सुवर्णपदक आणि 200 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. या यशानंतर तिचे भरपूर कौतुकही केले होते, पण या स्पर्धेनंतर गेल्या महिन्याभरापासून ऐश्वर्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.
ही फेडरेशन कप स्पर्धा कोळीकोडे येथे झाली होती. या स्पर्धेनंतर ऐश्वर्याची उत्तेजक चाचणी घेण्यात येणार होती. तिची ही चाचणी राष्ट्रीय प्रतिबंधक संस्था म्हणजेच नाडा आणि जागतिक ऍथलेटिक्स संघटनेची ऍथलेटिक इंटिग्रिटी युनिट (एआययू) घेणार होते.
परंतु त्यांना गेल्या महिन्यापासून ऐश्वर्याच्या चाचणीसाठी नमुने घेण्यासाठी तपास लागलेला नाही. त्याचमुळे सध्या अशी चर्चा आहे की, ऐश्वर्या उत्तेजक चाचणी टाळण्यासाठी बेपत्ता झाली आहे.