मुंबई – मुसळधार पावसाने काल रात्रीपासून मुंबईला अक्षरशः झोडपून काढलं आहे. पुढचे तीन तास शहरात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्मण झाली असून, शहरातील काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सकाळी आठ वाजल्याच्या दरम्यान लालबागच्या जयहिंद टॉकिज जवळ गुडघाभर पाणी साचले होते. नेहमी प्रमाणे यंदाही मुंबईकरांना या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.