मुंबई – भारतासह जगभरामध्ये सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले असून या संकटाचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. महाराष्ट्रात देखील कोरोनाग्रस्तांचा आकडा १०० पार गेला आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी सध्या महाराष्ट्र शासनाने राज्यभरात संचारबंदी लागू केली असली तरी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना दिसत आहेत.
नागरिकांना बाहेर पडण्यापासून रोखण्यासाठी आता पोलीस यंत्रणेने मोर्चा सांभाळला आहे. राज्यामध्ये संचारबंदी असल्याने आपल्या घरातून बाहेर पडणे बेकायदेशीर आहे. अशातच मुंबईमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर सध्या पोलिसांतर्फे गुन्हे दाखल करण्यात येत असून आजच्या दिवशी एकूण ११२ जणांवर कलम १८८ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये सामान्य नागरिक, पान-पट्टी चालक, हॉटेल व्यावसायिक यांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोना हा विषाणू अत्यंत संसर्गजन्य असल्याने नागरिकांना या धोक्यापासून सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Mumbai Police: 112 cases have been registered under section 188 of IPC against individuals, pan stalls, hotels, hawkers & illegal transport for violating prohibitory orders. #Coronavirus
— ANI (@ANI) March 24, 2020