मुंबई – मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा नेतृत्व सोडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत झालेले सर्व आठही सामने मुंबईने गमावले आहेत. त्यामुळे सध्या सर्व स्तरांवरून मुंबई संघावर तसेच कर्णधार रोहितवर कडाडून टीका सुरू झाली आहे.
या पराभवांमुळे मुंबईचे यंदाच्या स्पर्धेत प्लेऑफ गटात स्थान मिळवण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. प्रत्येक पराभवानंतर रोहितने आगामी सामन्यात संघ विजयाच्या मार्गावर येईल, असे सांगितले होते. मात्र, त्यांची पराभवाची मालिकाच कायम राहिल्यामुळे आता त्यांना टीकेचे धनी व्हावे लागत आहे.