पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते चेन्नई सेंट्रलदरम्यान धावणाऱ्या पार्सल रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
मध्य रेल्वेकडून विविध वस्तू, शेतमाल आदीच्या मालवाहतुकीवर भर देण्यात येत आहे. याच अनुषंगाने मुंबई-चेन्नई-मुंबई मार्गावर पार्सल गाडी सोडण्यात येत आहे. ती आठवड्यातून दोनवेळा सोडण्यात येत असून, तिच्या वेळापत्रकात बदल केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथून 31 डिसेंबरपर्यंत दर सोमवारी आणि शुक्रवारी रात्री 12.20 वाजता सुटणार असून, पुणे स्थानकात पहाटे 4.20 वाजता आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5.30 वाजता चेन्नई येथे पोहोचणार आहे. यापूर्वी ही गाडी मंगळवार आणि शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सोडण्यात येत होती, अशी माहिती प्रशासनाने दिली.