इंदौर – महिलांच्या वरिष्ठ गटाच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या गोलंदाजांनी नागालॅण्डच्या महिला संघाचा 50 षटकांच्या सामन्यात केवळ 17 धावांत खुर्दा उडवला. यानंतर विजयासाठी आवश्यक 18 धावा केवळ चार चेंडूत पूर्ण करत मोठा विजय नोंदवला.
महिलांच्या वरिष्ठ गटाच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत नागालँड आणि मुंबई आमने सामने होती. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजीस आलेल्या नागालॅण्डच्या महिला संघाच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांसमोर सपशेल लोटांगण घातले.
या सामन्यात मुंबईच्या सायली सतघरेने केवळ 5 धावांत नागालॅण्डचे 7 फलंदाज बाद केले. नागालॅण्डकडून सरिबाने सर्वाधिक 9 धावा केल्या.
मुंबईकडून फलंदाजीमध्ये सलामीवीर ईशा ओझाने 3 चौकारांच्या मदतीने 13 धावा केल्या तर रुषाली भगतने एका चेंडूमध्ये एक षटकार मारुन 6 धावा केल्या. (चार चेंडूपैकी गोलंदाजाचा एक चेंडू नो बाॅल होता.) आणि मुंबईने हा सामना 296 चेंडू शिल्लक ठेऊन जिंकला.