मुंबई – महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही जगातील दुसऱ्या क्रमांकाचं प्रामाणिक शहर ठरले आहे जागतिक पातळीवर आघाडीचे मासिक असलेल्या रीडर्स डायजेस्टने केलेल्या एक प्रयोगशील सर्वेक्षणात हे निष्कर्ष समोर आले आहेत डायजेस्टने जाणीवपूर्वक केलेल्या वालेट एक्सपिरिमेंट या सामाजिक उपक्रमाच्या निष्कर्षातून मुंबई हे दुसऱ्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर ठरले आहे पहिला क्रमांक फिनलंडची राजधानी हेलसिंकी या शहराने पटकावले आहे.
रीडर्स डायजेस्टच्या टीमने जगातील सोळा मोठ्या शहरांमध्ये मुद्दामून 192 वॉलेट्स हरवण्याचे काम केले म्हणजे प्रत्येक शहरांमध्ये बारा वॉलेट्स मुद्दामून हरवण्यात आली प्रत्येक वॉलेटमध्ये वॉलेट च्या मालकाचे नाव पत्ता बँकेची कार्ड आणि इतर महत्वाची डॉक्युमेंट आणि स्थानिक चलनात 50 डॉलर्स ठेवण्यात आली होती.
जाणीवपूर्वक हरवण्यात आलेल्या पाकिटांपैकी किती वॉलेट्स मालकापर्यंत पोहोचतात हे रिडर्स डायजेस्ट च्या टीमने पाहण्याचे ठरवले होते हरवण्यात आलेल्या मुंबईत 12 पैकी नऊ पाकिटे त्याच्या मालकापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचली त्यामुळे मुंबईने या उपक्रमात दुसरा क्रमांक पटकावला हेलसिंकी शहरामध्ये बारा पैकी 11 वॉलेट्स परत करण्यात आली आणि बुडापेस्ट या शहरांमध्ये बारा पैकी आठ वॉलेट्स परत करण्यात आली.
लंडनमध्ये बारा पैकी फक्त पाच वॉलेट्स प्रामाणिकपणे पोचवण्यात आली सर्वात खालचा क्रमांक लिसबन या शहराने पटकावला मुद्दामून हरवण्यात ठरवण्यात आलेल्या 12 पैकी फक्त एक वॉलेट प्रामाणिकपणे मालकापर्यंत पोहोचवण्याचे काम लिसबनमधील नागरिकांनी केले जगातील इतर सर्वात मोठ्या शहरांपैकी मास्को बर्लिन झुरीच या शहरांमध्येही प्रामाणिकपणा कमी आढळला या शहरांमध्ये बारा पैकी तीन ते चार पाकिटे मालकापर्यंत प्रामाणिकपणे पोचवण्यात आली