बडोदा : शाम्स मुलानी व शार्दुल ठाकूर यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत पडझड झाल्यानंतरही बडोदाविरूध्द दुस-या दिवशी पहिल्या डावात १०६.४ षटकात सर्वबाद ४३१ धावांचा डोंगर उभारला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना युवा सलामीवीर पृथ्वी शाॅ आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतक झळकावले. मात्र इतर फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने मुंबईचा डाव गडगडला.
End Innings: Mumbai – 431/10 in 106.4 overs (S Z Mulani 89 off 141, Tushar U Deshpande 18 off 29) #BDAvMUM @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 10, 2019
पृथ्वी शाॅने ६६ तर रहाणेने ७९ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव गडगडला आणि ३०० धावांच्या आत मुंबईचा संघ संपुष्टात येईल अस वाटत असताना मुलानी आणि शार्दुल यांनी मुंबईचा डाव सावरला व संघाची धावसंख्या ४०० पार नेली. शाम्स मुलानीने १४१ चेंडूत ८९ तर शार्दुल ठाकूरने ६३ चेंडूत ६४ धावा केल्या.
बडोदा संघाकडून पहिल्या डावात गोलंदाजी करताना भार्गव भट याने ३१ षटकात १२५ धावा देत ३ तर अभिमन्युसिंग याने १७ षटकात ७७ धावाच्या बदल्यात २ गडी बाद केले. युसूफ पठाणने सर्वोत्तम गोलंदाजी करताना १०.४ षटकात २६ धावा देत ३ गडी बाद केले.