कराची – पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्या पाठोपाठ आता त्यांचा अव्वल सलामीवीर फलंदाज महंमद रिझवान यानेही भारताच्या विराट कोहलीला मागे टाकले आहे. सर्वात कमी डावांत टी-20 क्रिकेटमध्ये 2000 धावांचा पल्ला पार करणारा रिझवान बाबर आझमनंतर दुसराच खेळाडू ठरला आहे.
रिझवानने बाबरशी बरोबरी करत 52 व्या डावात हा पल्ला पार केला तर कोहलीने हा पल्ला 56 डावांत गाठला होता. इंग्लंडविरुद्ध मंगळवारी झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात रिझवानने 68 धावांची अफलातून खेळी केली व त्याचदरम्यान त्याने ही कामगिरी केली.
Pakistan are 87-1 at the halfway mark 🏏
Rizwan is joined by Haider in the middle 👍#PAKvENG | #UKSePK pic.twitter.com/qZinLRaVFi
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 20, 2022
सर्वात कमी डावांत हा पल्ला गाठणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 58 डावात टी-20 क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा पार केला होता. तर ऑस्ट्रेलियाच्या ऍरन फिंचने 62 डावांत हा टप्पा पार केला आहे.