देऊळगाव राजे – कधी अतिवृष्टी तर कधी पावसाने ओढ, अशा परिस्थितीत महावितरण शेतकऱ्यांना बिल भरा नाहीतर कनेक्शन तोडू असा इशारा दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी कोरोना रोगाचा सामना करीत असून कोणत्याच शेतीमालाला योग्य भाव नाही, अशातच मार्च महिन्यात शक्य असेल तेवढी बाकी शेतकऱ्यांनी भरली आहे.
आता पुन्हा महावितरण कंपनी शेतकऱ्यांच्या मागे लागली असून बिल भरा नाहीतर लाईट बंद केली जाईल असे सांगत आहे. सध्या तरी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिल भरण्याची नाही. त्यातच परिसरात अजुन पाऊस झालेला नाही. आडसाली लागण केलेले उस पाण्याअभावी सुकून चालले आहे. शेतकऱ्यांना उन्हाळ्यात जसे हाल होत आहेत तसा अनुभव ऐन पावसाळ्यात आला आहे. यातच शेती पंप बंद करण्यात घाट महावितरणने घातला आहे.
तरी किमान परिस्थितिचे भान ठेहुन किमान आता तरी महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. शेतकऱ्यांचे उस गेल्यावर बिल आल्यावर सर्व शेतकरी महावितरणचे बिल भरतील पण आता लाइट बंद करण्याची ही वेळ नाही. या कठीण परिस्थितीत सहकार्याच ेआवाहन करण्यात येत आहे.