मुंबई – बांगड्या भरण्याबाबत वक्तव्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यात आता मिसेस फडणवीसांनीही उडी घेतली आहे.
A cocooned worm will never understand the ‘Pun’ of life ! It’s meant to thrive on the glory of the silken life woven for its comfort by its ancestors @AUThackeray ! Proud of ur struggles @Dev_Fadnavis & each and every hardworking member of @BJP4Maharashtra ! https://t.co/wshocfceIa
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 26, 2020
अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर टीका करत ट्विट केले आहे की,’रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही, कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशमी’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिमान वाटतो’, अशा आशयाचं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंच्या ट्वीटला कोट करत दिलं आहे. यामध्ये आदित्य ठाकरे, पती देवेंद्र फडणवीस आणि भाजपला त्यांनी मेन्शन केलं आहे.
तत्पूर्वी,’शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील आम्ही नाही’ असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावरच्या भाषणात केलं होत. मात्र, त्यावरून राज्याचे पर्यटनमंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आदित्य यांनी सोशल मीडियावर एक ट्विट सुद्धा शेअर केलं आहे.
आदित्य म्हणाले कि, “राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचं वक्तव्य शोभत नाही. देवेंद्रजी, सहसा मी टीकेला प्रत्युत्तर देत नाही. मात्र तुम्ही भाषणात ‘शिवसेनेने बांगड्या भरल्या असतील आम्ही नाही’ अशी टीका केली होती. मात्र, बांगड्या हे काही कमकुवतपणाचं लक्षण नाही, त्याला कमी लेखू नका. महिला या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. राजकारण हे होत राहील. मात्र टीकेचा आणि चर्चेचा स्तर आपण राखला पाहिजे. त्यामुळे तुम्ही माफी मागितली पाहिजे. असं ठाकरे बोलले होते.