हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. खरतड अशा परीक्षांना सामोरं जातात. यात अनेकांना अपयश पदरी पडतं तर काहींना यश मिळतं. हिंगोली जिल्ह्यातील साखरा गावच्या एका मुलीने देखील मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केलं आहे. या मुलीने फक्त परीक्षाच पास केली नाही तर राज्यात कर निरीक्षक म्हणून सहावा क्रमांक पटकवला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या 2021 च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात हिंगोली जिल्ह्यातील साखरा येथील विद्या अंकुश कांदे हिने घवघवीत यश मिळवलं आहे. एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. काही विद्यार्थ्यांना यश संपादन होते तर काही विद्यार्थ्यांना अनेकदा वर्षानुवर्ष मेहनत घ्यावी लागते. सरकारी नोकरी किंवा सरकारी अधिकारी व्हावे, अशी इच्छा अनेक तरुणांनीची असते. अशा तरुणींसाठी विद्या कांदेची कहाणी प्रेरणादायी आहे.
एमपीएससी अंतर्गत घेण्यात आलेल्या एसआयटी परीक्षेचा निकाल लागला. यात विद्याला 277.5 मार्क मिळाले आहेत. या गुणांसह विद्याने राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे. 2021 साली विद्याने ही परीक्षा दिली होती. विद्याच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सुरुवातीपासून शिक्षणात हुशार –
विद्याने सुरुवातीचे शिक्षण साखरा गावातील जिल्हा परिषद शाळेत घेतले. 10 वीनंतर 11 वी व 12 वी चे शिक्षण तिने परभणी येथील नवोदय विद्यालयत पूर्ण केले व सध्या ती साखरा येथे ग्रामीण डाक सेवक या पदावर कार्यरत आहे. हि नौकरी करत तिने महाराष्ट्र राज्य कर निरीक्षक या पदावर तिची निवड झाली आहे व महाराष्ट्रातून मुली मधून सहावा क्रमांक तिने पटकावला आहे.
विद्याच्या या यशामागे तिच्या भावाचा सिंहाचा वाटा आहे. विद्या लहान असतांना तिचे वडील मृत्यू पावले. आई ने काबड कष्ट करू मुलाबाळांना शिकवले मात्र जसे मुले मोठी होत गेली तसा शिक्षणाचा खर्च देखिल जास्त लागत होता. विद्याचा भाऊ विकास कांदे यांनी स्वताचे शिक्षण कमी केले मात्र आपल्या बहीनेचे शिक्षण त्याची पूर्ण केले. आज तिचे राज्यकर निरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल सर्व स्तरावरुन तिचे कौतुक केले जात आहे.