मुंबई – करोना महासाथीमुळे लांबणीवर पडलेल्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यात येत्या रविवारी (१४ मार्च) राज्यसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा घेण्यात येणार होत्या, मात्र आज आयोगातर्फे या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या असल्याची घोषणा करण्यात आली.
राज्यातील करोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला असून ठिकठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरून याचा निषेध नोंदवत आहेत. अशातच आता भाजप नेते निलेश राणे यांनी “उद्धव ठाकरे विद्यार्थ्यांचं आयुष्य का उध्वस्त करताय?” असा संतप्त सवाल उपस्थित केलाय.
याबाबत निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन भाष्य केलं आहे. ते लिहतात, “मुंबईमध्ये व इतर ठिकाणी जिथे कोरोना सर्वाधिक आहे तिथे बियर बार, डान्स बार सकाळी पाच वाजेपर्यंत रोज चालतात, सोशल मीडियावर त्याचे पुरावे फिरतायत पण महाराष्ट्राचे भवितव्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांची MPSC परीक्षा पुढे ढकलली.”
मुंबईमध्ये व इतर ठिकाणी जिथे कोरोना सर्वाधिक आहे तिथे बियर बार, डान्स बार सकाळी पाच वाजेपर्यंत रोज चालतात, सोशल मीडियावर त्याचे पुरावे फिरतायत पण महाराष्ट्राचे भवितव्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांची MPSC परीक्षा पुढे ढकलली. असं हरामी सरकार कुठेच नसेल.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 11, 2021
यावेळी त्यांनी राज्य सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधताना, “MPSC च्या होणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी हे महाभकास आघाडी खेळत आहे. १० दिवस अधिवेशन चाललं कोणाला कोरोना झाला??, या अगोदर अनेक वेळा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. उद्धव ठाकरे विद्यार्थ्यांचं आयुष्य का उध्वस्त करताय?” असा संतप्त सवाल उपस्थित केलाय.
MPSC च्या होणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी हे महाभकास आघाडी खेळत आहे. १० दिवस अधिवेशन चाललं कोणाला कोरोना झाला??, या अगोदर अनेक वेळा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. उद्धव ठाकरे विद्यार्थ्यांचं आयुष्य का उध्वस्त करताय??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 11, 2021