औरंगाबाद – औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी घाईघाईने औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव केले.परंतु यांचा त्रास सर्वसामान्यांना होणार आहे.
सरकार वाचवण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यात आले असल्याची टीका जलील यांनी यापूर्वी देखील केली होती. आता जलील यांनी संभाव्य आर्थिक परिणाम आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्येबाबत भाष्य केले आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना जलील म्हणाले, “असे काही लोक आहेत ज्यांना प्रत्येक गोष्ट जातीय रंगात रंगवायची आहे. हा केवळ मुद्दा नाही तर हिंदू आणि मुस्लिमांशी संबंधित विषय आहे. एखादी व्यक्ती अनेकदा स्वत:ची ओळख शहराशी करून घेते. नाव बदलले तर त्यासाठी प्रचंड पैसा लागतो. मी एका अहवालात वाचले की, जर तुम्हाला एखाद्या लहान शहराचे नाव बदलायचे असेल तर त्यासाठी सुमारे 500 कोटी रुपये लागत असल्याचे जलील यांनी सांगितले.
#WATCH | Maharashtra: Changing the name of Aurangabad will put a burden of around Rs 1000 crores on the govt. This is only to change the documents of the government department. Common people have to go through a burden of several thousand crores: AIMIM MP Imtiaz Jaleel (11.07) pic.twitter.com/hr17HeSxBF
— ANI (@ANI) July 12, 2022
नाव बदलण्यासाठी पैसे लागतात
इम्तियाज जलील म्हणाले, दिल्लीतील एका अधिकाऱ्याने मला सांगितले की, औरंगाबादसारख्या शहरासाठी 1000 कोटी रुपये लागतील. हे फक्त अधिकृत कागदपत्रे आणि पत्रव्यवहार बदलण्यासाठी आहे. हे सर्व तुमच्या आमच्या कराच्या पैशातून होईल. ते म्हणाले, जर माझ्याकडे दुकान असेल तर ते बदलावे लागेल. नवीन आधार कार्ड बनवावे लागेल. तुम्हाला रांगेत उभे राहावे लागेल. उद्धव ठाकरे किंवा शरद पवार किंवा इतर नेते तुमच्या मदतीला येतील असे नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होणार आहे.