मुंबई – लाफ्टर क्वीन या नावाने प्रसिद्ध असलेली कॉमेडियन भारती सिंग हे आज मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय नाव आहे. ती आज आलिशान जीवन जगत आहे आणि भरपूर पैसाही कमावत आहे. पण कधीकाळी भारती सिंग आणि तिच्या कुटुंबाला खूप गरिबीचा सामना करावा लागला. असे दिवस पाहावे लागले जेव्हा आई उदरनिर्वाहासाठी शौचालये साफ करायची आणि कुटुंब लोकांच्या उष्ट्या अन्नावर पोट भरायचे. एका डिजिटल शोमध्ये भारती सिंहने आपल्या लहान पनीच्या अनेक आठवणी सांगितल्या.
भारती सिंहने नीना गुप्ताच्या डिजिटल पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने आपल्या गिरीबीतील काही गोष्टी सर्वांसमोर शेअर केल्या. अवघ्या दोन वर्षांची असताना भारतीचे वडील वारले. त्यावेळी तिचे भाऊ आणि बहीण ब्लँकेटच्या कारखान्यात काम करायचे. आई घरोघरी काम करायची असा खुलासा भारतीने आईवेळी केला. भारती सांगते परिस्थिती इतकी हालाकीची होती की आई काम करून येताना इतरांच्या घरी उरलेले अन्न आमच्यासाठी घेऊन यायची आणि आम्ही त्यावर दिवस काढायचो.
भारती सिंह पुढे म्हणाली, ‘मी किती गरिबी पाहिली आहे याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. खाल्ल्यानंतर कोणी अर्धे सफरचंद फेकून देताना दिसले तर मला वाटायचे की तो अन्न वाया घालवतो म्हणून त्याला शाप मिळेल. कधी कधी फेकून दिलेले अर्धे सफरचंद उचलून खाण्याचा विचारही केला. माझी आई लोकांच्या घरी काम करायची तेव्हा मी दाराजवळ बसायचे. ती टॉयलेट साफ करायची. आम्ही निघालो की लोक आम्हाला उरलेले अन्न द्यायचे. आज मी माझ्या आईला सांगते की मी जे काही केले आहे आणि जे काही कमावले आहे ते तुझ्यामुळे आहे.
भारतीने सांगितले की, कॉलेजमध्ये एकदा ती बागेत कॉमेडी करून लोकांना हसवत होती तेव्हा सुदेश लहिरीने तिला पाहिले. तिथूनच भारती सिंगला संधी मिळाली. भारतीने पहिल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात परफॉर्म केले, ज्यासाठी ती टीमसोबत आंध्र प्रदेशला गेली होती. आज भारती सिंह एक कॉमेडियनच नाही तर होस्ट आणि प्रोड्युसर देखील आहे.