जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड नगरपरिषदेच्या वतीने बसवण्यात आलेले विविध चौकांतील दिवे नादुरुस्त, तर त्यातील काही सुरू वा काही बंद असल्याने बहुतांश चौक अंधारात बुडून जात आहेत. बंद पथदिव्यांच्या दुरुस्तीकडे मात्र नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत आहे.
नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर नागरपरिषदेच्यावतीने शहरातील अनेक चौकांमध्ये पथदिवे बसविले आहेत. मात्र, त्यांची नियमित देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने हे दिवे असून-नसून सारखेच झाले आहेत. काही चौकांत दिव्यांच्या पाच-सहा पॅनेलपैकी अवघे एक वा दोन सुरू आहेत. बाकीचे बंद असल्याने त्या दिव्यांच्या खालच्या भागात चक्क काहीसा अंधारच असतो. दुकाने बंद झाल्यावर अडचण बहुतांश रस्त्यांवर तसेच चौकांतून विविध व्यवसाय रात्री साडेनऊ-दहापर्यंत सुरू असतात. विविध व्यावसायिक दालनांचा बराचसा उजेड रस्त्यांवर येत असतो. शिवाय रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या छोट्या-मोठ्या वाहनांच्या प्रखर दिव्यांचा उजेड रस्ता उजळून टाकतो.
रात्री दुकाने बंद झाल्यावर व रस्त्यावरील वाहनांचीही वर्दळ कमी झाल्यावर बहुतांश चौकांत जवळपास अंधाराचे साम्राज्य असते. अशा स्थितीत रस्त्यातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. अनेक मोठ्या चौकांत एकच बल्ब बसविण्यात आला आहे. त्याचाही प्रकाश पडत नाही, तर अनेक ठिकाणी बसविण्यात आलेले दिवे बंद पडले आहे. नगरपरिषदेच्या वतीने विद्युत साहित्य खरेदी करण्यासाठी निविदा काढून खरेदी केलेले बल्ब नगरपरिषदेच्या विद्युत विभागाने कुठे लावलेत, याचा थांगपत्ता लागत नाही. नागरिकांची तक्रार आल्यास सामान शिल्लक नाही. तुम्ही खरेदी करा. आम्ही बसवून देऊ, असे उत्तरे नगरपरिषदेचे कर्मचारी देतात. त्यामुळे पथदिव्यांची नियमित दुरुस्ती गरजेची झाली आहे.