नवी दिल्ली – यंदाच्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कारासाठी जवळपास पाचशे पेक्षा अधिक अर्ज आले आहेत. यामध्ये खेळाडू आणि प्रशिक्षक यांचा समावेश आहे. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये . खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य व ध्यान चंद पुरस्कारांसाठी तब्बल सहाशेहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.दरवर्षी 29 ऑगस्टला क्रीडा पुरस्कारांचे वितरण केले जाते. सलग दोन वर्ष कोरोनामुळे ह्या पुरस्कारांचे आभासी पद्धतीने वितरण करण्यात आले आहे. यावेळी ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धेनंतर खेळाडूंची निवड करून पुरस्कार देण्याचा निर्णय क्रीडा मंत्रालयाने घेतला होता.
मागील वर्षी मागील वर्षी या पुरस्कारांसही 400 हून अधिक अर्ज दाखल झाले होते, तो विक्रम यावेळी मागे पडला आहे. क्रीडा मंत्रालयाचे पदाधिकारी व त्यांच्या सहकाऱयांनी अर्जांची छाननी सुरू केली असून त्यांच्याकडून शिफारस झालेल्या खेळाडूंची यादी पुरस्कार निवड समितीकडे लवकरच पाठविण्यात येणार आहे.
सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश मुकुंदकुम शर्मा हे या पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष आहेत. दाखल झालेल्या आर्जमध्ये सर्वाधिक अर्जुन पुरस्कारासाठी 215 अर्ज त्यापाठोपाठ ध्यान चंद जीवनगौरवसाठी 138, द्रोणाचार्यसाठी 48 तर मेजर ध्यान चंद खेल रत्न पुरस्कारासाठी यावर्षी एकूण 35 अर्ज आले आहेत.