नवी दिल्ली – देशभरात गेल्या दोन दिवसांत कोविड -19 चा संसर्ग झालेले 82 हजारांपेक्षा जास्त रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. बरे झालेल्या रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे बरे होणाऱ्या रूग्णांची राष्ट्रीय सरासरी 78.64 टक्के इतकी झाली आहे.
आतापर्यंत एकूण 40 लाखांपेक्षा जास्त रूग्ण बरे झाले आहेत. सक्रिय रूग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रूग्णांची संख्या 30 लाखांपेक्षा जास्त म्हणजेच चार पटीने जास्त आहे. बरे झालेल्या रूग्णसंख्येतील वाढीमुळे गेल्या 30 दिवसांतील बरे झालेल्या रूग्णांच्या सरासरीतही 100 टक्के वाढ झाली आहे.
बरे झालेल्या एकूण रूग्णांपैकी 21.22 टक्के रूग्ण महाराष्ट्रातील असून त्याखालोखाल आंध्र प्रदेशमधले 10 हजार कर्नाटक आणि त्तर प्रदेशमधले साडे 6 हजार आणि तमिळनाडूमधले साडे 5 हजार असे एकूण 35 टक्के अधिक रूग्ण बरे झाले आहेत. या सर्व राज्यांमधले एकूण 57 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.
आजघडीला देशातील एकूण सक्रिय रूग्णांच्या संख्येने 10 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यातील सुमारे निम्मे सक्रिय रूग्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये आहेत. तर या राज्यांबरोबरच उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू, अशा पाच राज्यांमध्ये सुमारे 60 टक्के सक्रिय रूग्ण आहेत.
देशभरात गेल्या 24 तासात करोना संसर्गामुळे 1,132 जण दगावले आहेत. यात महाराष्ट्रातील 474 जणांचा समावेश असून दगावलेल्या एकूण रूग्णांपैकी 40 टक्क्यांपेक्षा जास्त रूग्ण महाराष्ट्रातील आहेत.
त्याखालोखाल उत्तर प्रदेश, पंजाब, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल अशा चार राज्यांमधील 25 टक्के रूग्ण गेल्या 24 तासांत दगावले आहेत.