नवीदिल्ली – दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यावर अंमलबजावणी संचालनालय आपली पकड घट्ट करत आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटे दिल्लीसह तीन राज्यांमध्ये मोठे छापे टाकल्याचे वृत्त समोर आले आहे. दिल्लीशिवाय पंजाब आणि हैदराबादमध्ये 35 ठिकाणी ईडीचे छापे सुरू असलयाचे समजते.
ईडीच्या छापेमारीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट केले, “500 हून अधिक छापे, 3 महिन्यांपासून 300 हून अधिक CBI आणि ED अधिकारी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात पुरावे शोधण्यासाठी 24 तास काम करत आहेत. काहीही सापडत नाही, कारण काहीही केले गेले नाही. आपल्या घाणेरड्या राजकारणासाठी अधिकाऱ्यांचा वेळ वाया घालवला जात आहे. अशाने देशाची प्रगती कशी होणार?” असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.
500 से ज़्यादा रेड, 3 महीनों से CBI/ED के 300 से ज़्यादा अधिकारी 24 घंटे लगे हुए हैं- एक मनीष सिसोदिया के ख़िलाफ़ सबूत ढूँढने के लिए। कुछ नहीं मिल रहा। क्योंकि कुछ किया ही नहीं
अपनी गंदी राजनीति के लिए इतने अधिकारियों का समय बर्बाद किया जा रहा है। ऐसे देश कैसे तरक़्क़ी करेगा? https://t.co/VN3AMc6TUd
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) October 7, 2022
गेल्या महिन्यात ईडीने दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात मोठी कारवाई केली होती. या लोकप्रिय प्रकरणात ईडीच्या पथकाने मद्यसम्राट समीर महेंद्रूला अटक केली होती. यापूर्वी, सीबीआयने याच प्रकरणात इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी ओन्ली मच लाउडरचे माजी सीईओ विजय नायर यांना अटक केली होती.