नवी दिल्ली – भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये यंदा कॉंग्रेस,आप आणि भाजप अशी टक्कर पाहायला मिळाली. भाजपने देखील निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवारांमध्ये महत्वाचे बदल केले होते. पुल दुर्घटना झालेल्या मोरबी विधानसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. मोरबी येथील पूल दुर्घटनेत तब्बल १४० हुन अधिक जणांना आपले प्राण गमावावे लागले होते त्यातच निवडणुका लागल्याने येथील जनता काय कल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपने या मतदारसंघातून कांतीलाल अमृतीया यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले. तर काँग्रेसकडून जयंतीलाल जेराजभाई पटेल यांनी निवडणूक लढवली. तर आम आदमीच्या तिकिटावर पंकज कांतीलाल यांनी निवडणूक लढवली होती. मत मोजणीला सुरुवात झाल्यानंतर ही जागा भाजपकडून जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
सकाळी साडे १० वाजेपर्यंतच्या मत मोजिनीअखेर कांग्रेसचे जयंतीलाल जेराजभाई हे तब्बल 600 मतांनी आघाडीवर होते.मताच्या विभाजनामुळे या ठिकाणी भाजपला नुकसान होताना दिसून आले. २९ ऑक्टोबर रोजी पूल कोसळण्याची घटना घडल्यानंतर सरकार विरोधात स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली होती.