तिरुवनंतपुरम: भारतीय संघाला रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, यापेक्षाही जास्त चर्चा रंगली ती कर्णधार विराट कोहलीने सीमारेषेवर घेतलेल्या अविश्वसनीय झेलाची.
संघात रवींद्र जडेजा आणि कोहलीच सर्वात उत्तम क्षेत्ररक्षक मानले जातात. कोहली जसा फलंदाज म्हणून महान आहे, तेवढाच तो एक चपळ क्षेत्ररक्षक म्हणूनही नावाजला जातो.
रविवारच्या सामन्यात कोहलीने लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करत असताना वेस्ट इंडिजचा भरात असलेला फलंदाज शिमरन हेटमेयरचा सीमारेषेवर पुढे अप्रतिम सूर मारत झेल घेतला. हा झेल पाहून संघ सहकारी, फलंदाजच नव्हे तर मैदानावर उपस्थित असलेले पंच आणि प्रेक्षक देखील अवाक झाले.