मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई उच्च न्यायालयातील जामीन अर्जाला विरोध केला. मनी लॉंड्रिंग प्रकरणाचे मुख्य सूत्रधार अनिल देशमुख हेच आहेत त्यांनी आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर करून संपत्ती गोळा केली असा दावा ईडीने केला आहे. देशमुख यांना जामीन मिळाल्यास ते पुराव्यांशी छेडछाड करू शकतात, असा दावाही ईडीने केला आहे.
देशमुख यांच्या जामीन याचिकेला उत्तर म्हणून ईडीने मुंबई उच्च न्यायालयात आज प्रतिज्ञापत्र दाखल केले. ईडीने अनिल देशमुख यांच्या जामीनाला विरोध करताना न्यायालयाला सांगितले की, देशमुख यांनी तपासात सहकार्य केले नाही आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी लपवल्या आहेत. त्यांनी चौकशीदरम्यान अनेक गोष्टी उघड केल्या नाहीत असेही ईडीचे म्हणणे होते.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 2 नोव्हेंबर रोजी ईडीने अटक केलेले अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत,
तपास एजन्सीने सांगितले की, या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे आणि काही लोकांची चौकशी होणे बाकी आहे. असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे अनिल देशमुख यांना मिळालेली नाहीत.
अनिल देशमुख, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाळे, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे हे कथित भ्रष्टाचार आणि खंडणी प्रकरणी 11 एप्रिलपर्यंत केंद्रीय अन्वेषण विभागाच्या कोठडीत आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर बडतर्फ सहायक निरीक्षक सचिन वाझे यांना मुंबईतील हॉटेल्स आणि बारमधून दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता.