श्रीगोंदा – जमिनीच्या वादातून उक्कडगावात राहणाऱ्या मागासवर्गीय महिलेच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लगट करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात विनयभंगासह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील फिर्यादीला आरोपींनी पोलिसांसमोर मारहाण करून खोटा गुन्हा मंगळवारी दाखल केला, अशी माहिती समजते. संबंधित कुटुंब मोलमजुरी व शेती करून उपजीविका करते. त्यांच्या मालकीची शेतजमीन आहे. दादा गोलांडे हा दमदाटी करून हे शेत आमचे आहे, असे म्हणून शिवीगाळ करत असे.
15 जुलैला सायंकाळी साडेचारच्या सुमारास फिर्यादी शेतातून पाणी आणण्यासाठी जात असताना भाऊसाहेब गोरख गोलांडे याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यांची झटापट झाली. आरोपीने महिलेस धक्काबुक्की व जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.