रायपूर – श्रीलंकेला मालिकेत धुळ चारल्यानंतर भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड संघाचा 8 गडी राखून पराभव करून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. त्यामुळे 35 वर्षांपासूनचे किवींचे भारतात मालिका जिंकण्याचे स्वप्न अपूरेच राहिले. शनिवारचा सामना खऱ्याअर्थाने गाजविला तो भारतीय गोलंदाजांनी, ज्यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) वाटा मोठा होता. शमीच्या वेगवान माऱ्यासमोर पाहुण्या संघाची 5 बाद 15 अशी लाजिरवाणी सुरवात झाली होती. दुखापतीतून परतल्यानंतर शमीने ही किमया साधली. शनिवारच्या सामन्यानंतर त्याने भारताचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला एक महत्त्वाचा सल्ला दिला.
“कसं जिंकायचं ते भारताकडून शिका”, रमीझ राजांकडून टीम इंडियाचे कौतुक तर पाकिस्तानला घरचा आहेर
उमरान मलिक हा भारताकडून सर्वात वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज आहे. अलीकडेच त्याच्या वेगवान माऱ्यासमोर विरोधी संघाचे फलंदाज धडपडताना दिसले. काही सामन्यांमध्ये त्याने आपल्या फायर-ब्रीदिंग चेंडूंने भीती निर्माण केली. परंतु, त्याच्यात अनुभवाचा अभाव असल्याने त्याने अनुभवी गोलंदाज शमीकडून गोलंदाजीचे मार्गदर्शन घेतले. त्यांच्या या संभाषणाचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
Mohammad Siraj । सिराजच्या भन्नाट गोलंदाजीने रचला नवा रेकॉर्ड; इतर गोलंदाज आसपासही नाहीत
उमरानला मार्गदर्शन करताना शमी म्हणाला, आपण स्वतःवर दबाव येऊ देऊ नये आणि नेहमी आपल्या कौशल्यावर अवलंबून राहावे. अडचणीच्या काळात आपण भटकू शकतो, परंतु तरीही आपण आनंदी असले पाहिजे. तसेच आपल्या कौशल्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. तुझा वेग ही तुझी ताकद आहे, परंतु तुला लाईन आणि लेंथवर थोडे काम करण्याची गरज आहे. जर ते तु केलेस, तर जगावर राज्य करशील. तु चांगली कामगिरी करत आहेसच आणि पुढे ही करत राहा. त्यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा.
शमीने शनिवारी तीन फलंदाज बाद करताना अनेक विक्रम आपल्या नावे केले. तो वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा 10 गोलंदाज ठरला. शमीच्या नावार वनडे क्रिकेटमध्ये 87 सामन्यात 159 बळी आहेत. या यादीत अनिल कुंबळे अव्वल स्थानी आहे. त्यांनी 269 सामन्यात 334 बळी घेतलेले आहेत.
अनिल कुंबळेंच्या विक्रमाशी बरोबरी
शमीने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 6 षटके टाकताना न्यूझीलंडच्या 3 खेळाडूंना बाद केले. त्याने पहिल्यांदा फलंदाज फिन ऍलनला बाद केले. त्यानंतर डॅरिल मिशेल आणि मायकेल ब्रेसवेलच्या विकेट घेतल्या. त्याने 29व्यांदा वनडे क्रिकेटमध्ये तीन बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. हे करत तो भारतासाठी सर्वाधिक वेळा 3 बळी घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. अजित आगरकरने भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 3 किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याने 38 वेळा 3 बळी घेतले आहेत. जवागल श्रीनाथ दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 37 वेळा 3 बळी घेतले आहेत. झहीर खान (31 वेळा) तिसऱ्या स्थानावर आहे. शमी आणि अनिल कुंबळे यांनी 29 वेळा ही कामगिरी केली आहे.