केपटाऊन : मोहम्मद शमी (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांत सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये 200 पेक्षा अधिक बळी घेणारा चौथा भारतीय गोलंदाज ठरला. टेंबा बावुमा हा शमीचा 200 वा बळी ठरला. शमीने केपटाऊन येथील दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तिसर्या आणि अंतिम कसोटीच्या पहिल्या डावात 39 धावा देत दोन फलंदाज बाद केले.
यावेळी शमीने भारताचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खानला मागे टाकत सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांत सर्वाधिक बळी घेणार्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी विराजमान झाला.
जहिर खानने एकूण 198 बळी घेतले होते. या यादीत दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे 219 बळींसह अव्वल, म्हैसूर एक्स्प्रेस जवागल श्रीनाथ 212 बळींसह दुसर्या आणि विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव 211 बळींसह दुसर्या स्थानावर आहेत.
यावेली शमीने बावुमाला बाद करताना कर्णधार विराट कोहीलीच्या नावेही एक विक्रम जमा झाला. योगायोगाने तो झेल कर्णधार विराट कोहलीने घेतला त्यामुळे विराटने कसोटी क्रिकेटमध्ये आपले 100 झेल पूर्ण केले. एकदिवसीय आणि कसोटीत 100 झेल घेणारा कोहली चौथा भारतीय ठरला.
याआधी या मालिकेत शमी 200 कसोटी बळींचा टप्पा गाठणारा पाचवा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला, त्याने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या 5 फलंदाजांना बाद केले होते. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा हा त्याचा 200 वा बळी होता. 31 वर्षीय शमी 200 बळी घेणारा 11वा भारतीय गोलंदाज आहे. कसोटीत वेगवान गोलंदाजांमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणार्या गोलंदाजांमध्ये तो पाचव्या क्रमांकावर आहे.
गेल्या काही काळात शमीने आयुष्यात आणि क्रिकेटमध्ये अनेक चढउतार पाहिले आहेत. 2015 च्या विश्वचषकानंतर शमीला अनेक दुखापती झाल्या ज्यामुळे तो खेळापासून दूर राहिला. शमीने 2013 मध्ये घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याची पदार्पण मालिकाही सचिन तेंडुलकरची शेवटची मालिका होती. आतापर्यंत शमीने भारतासाठी सर्व सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये 350 हून अधिक बळी घेतले आहेत.