सोलापूर – अकलूज (ता़ माळशिरस) येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर आपले मत व्यक्त केले. दरम्यान, आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते की, ”देशात पाच वर्षातील सत्ता काळात भाजपाकडून एकही घोटाळा झाला नाही. मात्र विरोधकांना हे पाहवत नाही, म्हणून सातत्याने विरोधकांकडून खोटेखोटे आरोप केले जात आहेत. दिवसा स्वप्न बघणाऱ्यांना आणि खोटे बोलणाऱ्यांना मी थांबवू शकत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस फक्त हे माझ्याविरूद्ध लढत आहेत. या देशाला भविष्यात कुठे घेऊन जायचे याबाबतचा अजेंडा विरोधकांकडे नाही. विरोधकांकडून यंदाच्या निवडणुकीत फक्त एकच नारा देण्यात येत आहे तो म्हणजे मोदी हटाव… मोदी हटाव…असे मोदी म्हणाले.”
PM in Solapur, Maharashtra: Those sitting in Delhi in AC rooms & keeping a tab on things which will happen after who hugs whom, after who shakes hands with whom, after who looks at whom, they don’t know the ground reality. Now I know why Sharad Rao ran away from the battleground. pic.twitter.com/aCJMtAeBSH
— ANI (@ANI) April 17, 2019