मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला रविवारी (आज) रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील विजेचे दिवे बंद करून मेणबत्ती, दिवा अथवा मोबाईल फ्लॅशलाईट लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर देशभरातील विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असून दिवे लावल्याने कोरोनाला अटकाव केला जाऊ शकतो का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पाच महापुरुषांचा दाखला दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस व रामदास स्वामी यांच्या प्रसिद्ध घोषणांचा दाखला देत मोदींच्या आवाहनाची पाठराखण केली आहे.
आपल्या ट्विटमध्ये ते लिहतात, “केवळ हर हर महादेव ही गर्जना करून युद्ध जिंकता येत नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांनाही माहित होते. निव्वळ चले जाव ची घोषणा देवून इंग्रज पळून जाणार नाहीत हे महात्मा गांधींनाही माहित होते. तळ्याचे पाणी पिल्याने जातीयता नष्ट होणार नाही हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनाही माहित होते. रक्त मागून स्वातंत्र्य मिळणार नाही हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना माहित होते. जय जय रघुवीर समर्थ म्हणून जनसमुदाय एकत्र येणार नाही हे रामदास स्वामींनाही माहित होते. त्याचप्रमाणे दिवे लावून, टाळ्या वाजवून करोना जाणार नाही हे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनाही माहित आहे. पण या सर्व क्रियांमुळे जनतेचे मनोधैर्य वाढते. जे वाढणे आजच्या संकट समयी काळाची गरज आहे.”
दिवे लावून, टाळ्या वाजवून करोना जाणार नाही हे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनाही माहित आहे. पण या सर्व क्रियांमुळे जनतेचे मनोधैर्य वाढते. जे वाढणे आजच्या संकट समयी काळाची गरज आहे. pic.twitter.com/nV1LrmxZHs
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) April 5, 2020