श्रीहरीकोटा – चंद्रावर अंतराळ उतरवण्याच्या महत्त्वाकांक्षी “चांद्रयान-2’मोहिमेचे “विक्रम’ लॅंडर चंद्रावर उतरवण्याच्या काही मिनिटे अगोदर काही तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे “विक्रम’ लॅंडरकडून सिग्नल पाठवले जाणे थांबवले गेले. नियोजित वेळेच्या काही मिनिटे अगोदरपासून “विक्रम’ लॅंडरची स्थिती काय आहे, हे श्रीहरीकोटा येथील शास्त्रज्ञांना समजू शकले नव्हते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना धीर दिला.
#WATCH PM Narendra Modi: We will rise to the occasion and reach even newer heights of success. To our scientists I want to say- India is with you. You are exceptional professionals who have made an incredible contribution to national progress. #Chandrayaan2 pic.twitter.com/0378MUcHuv
— ANI (@ANI) September 7, 2019
विज्ञानात प्रयोग असतात, अपयश नाही.
चांद्रयान 2 मोहीमेचा अखेरचा टप्पा अपेक्षेनुसार झाला नाही तरीही त्याचा प्रवास शानदार होता.
लवकरच आपल्या हाती चांगला निकाल येईल. आपला इतिहास उज्ज्वल आहे. हार मानण्याची आपली संस्कृती नाही.
तुम्ही लोक दह्यावर रेषा खेचणारे लोक नसून दगडावर रेषा काढणारे लोक आहात
आजच्या धड्यातून पुढील मोहिमांसाठी मदत होईल. लवकरच चांगला निकाल आपल्या हातात येईल. हार मानने इस्त्रोच्या इतिहासात नाही. परिणामी निराश न होता पुढे चालत रहायचं
काही तांत्रिक अडचणीमुळे चंद्रावर पोहचू शकलो नाही, अडचणी आल्या तरी हिंमत हरू नका
रांत्रदिवस काम करणाऱ्या सर्व वैज्ञानिकांचे देश कौतुक करत आहे. सर्व देश तुमच्या पाठिशी उभा आहे.
वैज्ञानिकांच्या चेहऱ्यावर निराशा पाहून व्यथित झालो होतो.
संपूर्ण भारत देश इस्त्रोच्या पाठीशी उभा आहे. तूम्ही निराश होऊ नका.