नवी दिल्ली – देशात आर्थिक मंदी नसल्याचा दावा मोदी सरकारने केला होता. याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर हल्ला चढविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा स्वतःच्याच काल्पनिक दुनियेत राहत असल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे.
राहुल गांधी म्हणाले कि, जर नरेंद्र मोदी यांनी जनतेचे ऐकले असते तर कोणतीही समस्या उद्भवली नसती. नरेंद्र मोदी आणि अमित शहा स्वतःच्याच काल्पनिक दुनियेत राहतात. त्यांना बाहेरच्या जगाशी काहीही देणे-घेणे नाही. म्हणून त्यांना देशात कोणतेही संकट नसल्याचे वाटत आहे, असे त्यांनी सांगितले.
Rahul Gandhi, Congress on economic situation of the country: Mr Amit Shah and Mr Narendra Modi live in their own imagination, they have no contact with the outside world. They live in their own world & they fantasize about things, that is why the country is in such trouble. pic.twitter.com/wfhscpJEtu
— ANI (@ANI) December 5, 2019
दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशीच्या गैर-मुस्लिम लोकांना देशाचे नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. या विधयेकाला विरोधी पक्ष जोरदार विरोध करत आहेत.