नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मुलांना संबोधित केले. मुलांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले तुम्ही सर्वांनी इतक्या लहान वयात केलेले कार्य आश्चर्यकारक आहे. धैर्य आपल्या स्वभावात असले पाहिजे. धैर्याशिवाय आयुष्य शक्य नाही. कोणताही पुरस्कार हा शेवट नसतो, एक प्रकारे ती आयुष्याची सुरुवात असते. तुम्ही कठीण परिस्थितीत धैर्य दाखविले, एखाद्याने वेगवेगळ्या क्षेत्रात कामगिरी केली आहे.
दरम्यान, एक उदाहरण देताना मोदींनी स्मृती इराणी यांच्यासमोरच ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेचा उल्लेख केला. आणि एकच हश्या पिकला. त्यावर स्मृती इराणी आणि शौर्य पुरस्कार विजेत्या मुलांना हसू अनावर झालं. अभिनेत्री ते केंद्रीय मंत्री हा स्मृती इराणी यांचा प्रवास सर्वांना माहित आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली होती.
Interacting with recipients of Rashtriya Bal Puraskar, 2020. Watch. https://t.co/aMwRIevyIf
— Narendra Modi (@narendramodi) January 24, 2020
विद्यार्थ्यांशी बोलताना मोदी म्हणाले, आपल्या समाजाबद्दल, राष्ट्राबद्दलचे आपल्या कर्तव्याची तुम्हाला ज्या प्रकारे जाणीव आहे हे पाहून मला अभिमान वाटतो. आपण केलेले कार्य करण्याची चर्चा सोडून द्या, याचा विचार करूनही मोठ्या लोकांना घाम फुटतो. जेव्हा जेव्हा आपण सर्व तरुण साथीदारांच्या अशा धाडसी कार्याबद्दल मी ऐकतो तेव्हा मला प्रेरणा व शक्ती देखील मिळते.