नवी दिल्ली – पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाल्याच्या घटनेला आज एक वर्ष पुर्ण झाले. त्या निमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शहीदांना आदरांजली वाहिली. देशाचे व देशाच्या नागरीकांचे रक्षण करताना या जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे. या शूर सैनिकांना मानवंदना. त्यांनी देशासाठी जे हौतात्म्य पत्करले आहे ते कायम स्मरणात राहील असेही पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशातून या शहींद जवानांना आदरांजली वाहिली जात आहे. तथापी त्याचवेळी या हल्ल्याच्या घटनेची चौकशी पुढे का सरकू शकली नाही असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे. याच अनुषंगाने राहुल गांधी यांनी ट्विटरवर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सध्या भाजपकडूनही त्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे.