नवी दिल्ली – चीनी कुरापतींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन बाळगून असल्याविषयी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
आपल्या देशात चीन एक पुल उभारत आहे. मोदींच्या मौनामुळे चीनी सैन्याचे धैर्य वाढत आहे. आता त्या पुलाच्या उद्घाटनासाठीही कदाचित मोदी जातील अशी भीती वाटते, असे ट्विट राहुल यांनी केले. पूर्व लडाखमध्ये सीमेलगत चीन एका तलावावर पुल उभारत आहे.
त्यावरून राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला. चीनी कुरापतींमुळे अनेक महिन्यांपासून सीमेलगत तणावाची स्थिती आहे. ती स्थिती हाताळण्यावरून कॉंग्रेस आणि राहुल सातत्याने मोदी आणि त्यांच्या सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.