नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक पक्षाच्या नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या कार्यकाळावर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यसभेत गुलाम नबी यांच्या आठवणींना उजाळा देत असताना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
अगदी सर्वच पक्षातील मंडळींनी आझाद यांच्या स्वभावाची प्रशंसा केली. दरम्यान आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास कवितेच्या स्टाईलने आझाद यांना निरोप दिला आहे. रामदास आठवले यांनी गुलाम नबी आझाद यांच्यासाठी कविता सादर केली.
रामदास आठवले यांनी गुलाम नबी आझाद यांच्यासाठी कविता
राज्यसभा छोड़कर जा रहे गुलाम नबी
हम मिलते रहेंगे आपको कभी-कभी
आपका नाम है गुलाम, इसलिए मैं करता हूं आपको सलाम
आपका नाम है गुलाम, आप हमेशा रहे आजाद
आप हम सभी को रहे याद
15 अगस्त को भारत हुआ आजाद
लेकिन राज्यसभा से आज आप हो रहे आजाद
आप हमेशा रहो आजाद
हम रहेंगे आपके साथ
ये अंदर की है बात
मोदी जी जम्मू-कश्मीर का मजबूत करेंगे हाथ
और आपको देते रहेंगे साथ…
या कवितेच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी गुलाम नबी आझाद यांनी पक्ष बदल्याचे आवाहन केले आहे.