नवी दिल्ली – ढासळत्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकार विरोधात मोर्चा उघडला आहे. जीडीपीमधील अभूतपूर्व घसरणीचा दोष राहुल गांधी यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांना दिला आहे. एका व्हिडिओद्वारे त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी म्हणाले कि, मोदी सरकार जीएसटीची योग्य अंमलबजावणी करण्यास अयशस्वी झाली आहे. जीएसटी ही तत्कालीन युपीए सरकारची योजना होती. एक कर, कमीत-कमी कर, साधा आणि सरळ कर. मात्र, एनडीए सरकारचा जीएसटी पूर्णतः वेगळा आहे. यामध्ये चार वेगवेगळे टप्पे, २८ टक्क्यांपर्यत कर तसेच अधिक गुंतागुंतीचा असून समजण्यास अवघड आहे. हे पण जीडीपीच्या घसरणीला कारणीभूत आहे. जीएसटीच्या माध्यमातून मोदी सरकारने देशाचा आधार असलेल्या वर्गावर हल्ला केला आहे.
GDP में ऐतिहासिक गिरावट का एक और बड़ा कारण है- मोदी सरकार का गब्बर सिंह टैक्स (GST)।
इससे बहुत कुछ बर्बाद हुआ जैसे-
▪️लाखों छोटे व्यापार
▪️करोड़ों नौकरियाँ और युवाओं का भविष्य
▪️राज्यों की आर्थिक स्थिति।GST मतलब आर्थिक सर्वनाश।
अधिक जानने के लिए मेरा वीडियो देखें। pic.twitter.com/QdD3HMEqBy
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 6, 2020
राहुल गांधींनी जीएसटीला पुन्हा एकदा ‘गब्बर सिंह टॅक्स’ म्हंटले आहे. चुकीच्या यापद्धतीने जीएसटी लागू झाल्याने लाखो छोटे व्यावसायिक उद्ध्वस्त झाले. अनेक तरुणांचे भविष्य आणि नोकऱ्या अंधारात गेल्या आहेत. सर्वात जास्त अन्याय मोदी सरकारने राज्यांसोबत केला आहे. केंद्र सरकार राज्यांच्या जीएसटीचे पैसे देण्यास सक्षम नाही.
मोदी सरकारच्या जीएसटीचा अर्थ आर्थिक सर्वनाश आहे. राहुल गांधींच्या मते, मोदी सरकारने मुद्दाम जीएसटीमध्ये चार टप्पे ठेवले आहेत. जेणेकरून छोटे व्यावसायिक त्यात अडकून राहतील आणि मोठ्या उद्योगपतींना त्याचा फायदा होईल. या जीएसटीमध्ये केवळ १५-२० उद्योगपतींचा समावेश आहे, ते मनमानी पद्धतीने जीएसटीच्या नियमात बदल करु शकतात, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.
जीएसटी हे पूर्णतः अपयशी ठरले आहे. हे एकप्रकारे गरीब, छोटे व्यावसायिक, लघु व मध्यम उद्योग, शेतकरी आणि मजुरांवर आक्रमण आहे, आपण सर्वानी या आक्रमणाविरोधात एकजुटीने उभे राह्यला पाहिजे, असे आवाहनही राहुल गांधी यांनी केला आहे.