मुंबई : देशात मागील एक वर्षांपासून केंद्र सरकारने पारित केलेले तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली. त्यांच्या निर्णयानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत असतानाच शिवसेनेने आता ”व्वा! काय हा ‘मास्टर स्ट्रोक’” असे म्हणत पंतप्रधान मोदींसहीत भाजपालाही या मुद्द्यावरुन चिमटा काढला होता.
तर आज माध्यमांशी बोलतांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्ला बोल केला आहे.
ते म्हणाले,’केंद्रातील पीएम केअर फंडात अगणित, अन् बेहिशोबी पैसे पडलेले आहेत. त्या फंडातील पैसे आता केंद्र सरकारने मदतीसाठी वापरावे. मोदी सरकाला शेतकऱ्यांची आणि देशाची माफी मागून चालणारच नाही. मात्र ७०० कुटुंबांना आधार देणे गरजेचे आहे. मला खात्री आहे पंतप्रधान सह्रदयी आहेत ते मदत करतील.