मुंबई: मोदी सरकारकडे महाराष्ट्रातील दुष्काळ व पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पैसे नाहीत जाहिरातींवर मात्र ५,७०० कोटींची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भाजपवर निशाणा साधला आहे.
अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने दुष्काळ, वादळ, महापूर अशा नैसर्गिक आपत्तीसाठी केंद्र सरकारच्या वतीने कर्नाटक, ओडिशा या राज्यांसाठी करोडो रूपये मंजूर केले आहेत. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी ६८०० कोटी रुपयांची मदत केंद्राकडे मागून प्रसिद्धी मिळविली होती. केंद्राने मात्र फडणवीस यांना ठेंगा दाखविला. अन्य राज्यांना भरघोस मदत देताना महाराष्ट्राला मात्र एकही छदाम दिलेला नाही. दुस-या बाजूला सरकारचा प्रचार करण्यासाठी मोदी सरकारने ५,७०० कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेली सादर माहिती अशी, हिंदी भाषिक राज्यांमधील जनतेला भुलविण्यासाठी मोदी सरकारने इंग्रजी वृत्तपत्रांच्या तुलनेत हिंदी भाषिक वृत्तपत्रांसाठी भरपूर पैसा ओतला आहे. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये सरकारी जाहिरातींसाठी मोदी सरकारने ७१९ कोटी रुपयांहून अधिक पैसे खर्च केलेत, तर हिंदी वृत्तपत्रांमध्ये जाहिरातींसाठी ८९० कोटींहून अधिक पैसे मोजल्याचं समोर आलं आहे. माहिती अधिकारातून याबाबतची आकडेवारी समोर आली आहे. मे २०१४ ते मार्च २०१९ दरम्यान जाहिरातींवर सरकारने एकूण ५ हजार ७०० कोटी रुपये खर्च केल्याचं या आकडेवारीतून समोर आलं आहे.
इंटरनेटच्या जाहिरातीवरही चौपट उधळपट्टी
इंटरनेटवरील वाचकांच्या वाढत असलेल्या संख्येचा फायदा उचलत ५ वर्षांच्या कालावधीत इंटरनेट जाहिरातींवरील खर्च ६.६४ कोटी रुपयांहून वाढवून २६.९५ कोटी रुपये झाल्याचं आरटीआयमधून समोर आलं आहे.
जेंव्हा आम्ही अक्कल विकत घेतली…..
असे म्हणतात अक्कल तेंव्हाच येते जेंव्हा काहीतरी जेंव्हा अनपेक्षित ठेच लागते। असेच काहीसे काल परवाचा आलेला पुण्यातील पूर सांगून गेला। ज्यांना आम्ही आमचे जवळचे संमजायचो असे नेते आमच्याकडे फिरकले ही नाही।मत मागायला येणारी हीच काळी तोंडे आज परत पाठ फिरवून उभा राहिली। आचारसंहितेचा झेंडा दाखवून आपत्कालीनपरिस्थिती असतानाही त्यांना त्यांच्या खुर्च्या महत्वाच्या वाटल्या, शेवटी लढावे लागले ते फक्त मतदारांनाच, सामान्य माणसालाच। खरच काहो एवढि निर्दयी असतात ही लोक? खरच का हो हेच ते लोक जे शिवछत्रपती सारख्या राजेंच्या राज्यातील असतील? पुरग्रस्थानची अपेक्षा न्हवतीच हो मदतीची ह्या लोकांकडून पण कमीत कमीत खोट्या बातम्या तरी नव्हत्या द्यावयाचे यांनी।
लाज वाट्ते की असे आमदार खाजदारनिवडून दिले आम्ही ज्यांना जनते पेक्ष्या खुर्च्या महत्वाच्या वाटल्या। तेंव्हा आता आमचे तरी ठरलय याना यांची लायकी दाखवुनच द्यायची। मत मागायला आलेल्या एका ला तरी चाबकाने फटकवायचे। NOTA ला मत द्यायचे। नाहीतर फक्त बहिष्कार घालायचा मतदानावर।
शेवटी त्या रात्री एकच म्हणावेसे वाटले की होणार होतला जाणार जातला
मागे तू फिरू नको
उगाच सांडून खऱ्याची संगत
खोट्याची धरू नकोयेईल दिवस तुझा हि माणसा
जिगर सोडू नको
तुझ्या हाती आहे डाव सारा
इसार गजाल कालची रे
देवाक् काळजी रे
माझ्या देवाक काळजी रे
देवाक काळजी रे
माझ्या देवाक काळजी रे
सोबती रे तू तुझाच
अन् तुला तुझीच साथ
शोधूनि तुझी तू वाट
चाल एकला
होऊ दे जरा उशीर
सोडतोस काय धीर
रात संपता पहाट
होई रे पुन्हा।
फाटक्या झोळीत येऊन पडते
रोजची नवी निराशा
सपान गाठीला धरत वेठीला
कशी रं सुटावी आशा
हो फाटक्या झोळीत येऊन पडते
रोजची नवी निराशा
सपान गाठीला धरत वेठीला
कशी रं सुटावी आशा
अवसेची रात नशिबाला
पुनवेची गाठ पदराला
होईल पुनव मनाशी जागव
खचूनी जाऊ नको
येईल मुठीत तुझ्याही आभाळ
माघार घेऊ नको
उगाच भयाण वादळ वाऱ्याच्या
पाऊल रोखू नको
साद घाली दिस उद्याचा नव्याने
इसार गजाल कालची रे
देवाक काळजी रे
माझ्या देवाक काळजी रे
आपला….अमोल जठार