लाहोर – गेल्या वर्षी म्हणजे वर्ष 2019 च्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत मी म्हणालो होतो की, भारतातील मोदींच्या नेतृत्वातील फॅसिस्ट सरकार भारताला वाईट देशांच्या गर्तेत ढकलत आहे. आता भारतातील तापट पत्रकार अर्णव गोस्वामीच्या उघड झालेल्या चॅटसवरुन हेही स्पष्ट होत आहे की, मोदींनी बालाकोट हल्ले हे राजकीय लाभासाठीच केले होते, असे प्रतिपादन पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी केले आहे.
अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सऍप संवाद व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे याची चर्चा सुरू झाली. दोघांमधील संवादामध्ये मंत्र्याबद्दलही आक्षेपार्ह विधान करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर बालाकोट एअर स्ट्राईकबद्दलही दोघांमध्ये संवाद झालेला आहे. या संवादाबद्दल पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करून भाष्य केलं आहे.
नुकत्याच उघड झालेल्या या व्हॉट्सऍप चॅटमधून मोदी सरकार आणि भारतीय माध्यमांमध्ये असलेले चुकीच्या संबंधाचाही खुलासा झाला आहे. ज्यातून हेच दिसत आहे की, संपूर्ण खंडात अस्थिरता निर्माण होण्याच्या परिणामतेकडे दुर्लक्ष करून निवडणूक जिंकण्यासाठी हे धोकादायक लष्करी धाडस केलं केलं. पाकिस्ताननं बालाकोट संकट जबाबदारीनं टाळलं. मात्र, मोदींच्या अशा कृत्यांमुळं संपूर्ण आशिया खंडाच्या शांततेला बाधा पोहोचत आहे.
पाकिस्तानातील दहशतवादामागे भारतीय प्रायोजकत्व, भारतव्याप्त जम्मू काश्मीर आणि आमच्याविषयी 15 वर्षापासून चुकीची माहिती पसरवणारी मोहीम या चॅटमुळे उघडकीस आली आहे. आता भारतातील माध्यमांनी आपले संबंध उघड केले आहेत, जे दक्षिण आशियाला आण्विक क्षेत्रातील शस्त्रास्त्रस्पर्धेच्या संघर्षाच्या टोकाकडे ढकलत आहेत. माझं सरकार पाकिस्तान आणि मोदी सरकारच्या फॅसिस्टवादाविरुद्ध युद्धजन्य डाव उघडे पाडत राहिलं. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला बेजबाबदार आणि लष्करी अजेंड्यापासून थांबवायला हवे आहे, असं खान यांनी म्हटलं आहे.