पुणे/मांजरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकार खोटारडे आहे. शेतकरी आत्महत्या करतोय, पण सरकारला त्याचे काही वाटत नसून हे सरकार आंधळे झाले आहे. सरकारला शेतकऱ्यांची हाक ऐकू येत नसून ते बहिरे झाले आहे. या सरकारला केवळ उद्योगपतींची चिंता आहे. सरकारने उद्योगपतींचे लाखो कोटींचे कर्ज माफ केले. पण, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जात नाही. त्यातच हे केंद्रीय कृषी धोरणातून शेतकरी उद्धवस्त करण्याचे काम केले जात आहे, अशी टिका माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केली.
दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र होत असताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी उपबाजार येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. यावेळी मामा तुपे, वसंत शेवाळे, संजय शेवाळे, अनिल कामठे, नितीन आरू, दिलीप तुपे, विजय जाधव, अमोल घुले, वैभव डांगमाळी, बाळासाहेब हींगणे, संतोष सुपेकर, राजा शिंदे, खंडू लोंढे, रमेश चौधरी, ज्ञानेश्वर कांबळे, मसूद शेख, विजय राऊत, मच्छिंद्र वाडकर, बाळासाहेब भिसे, जयपाल भगवान, चंद्रकांत मगर, सीमा सावंत, रुपाली कोंडे, मंदाकिनी नलावडे, मधुकर बाजारे, हसन कुरेशी, माऊली तांबे, अजित ससाणे, बाळासाहेब टिळेकर, अरुण पटेल, स्वप्निल डांगमाळी, चेतन पडवळ, अर्जुन सातव, युसुफ शेख, प्रशांत नांदगुडे, राजेंद्र मारणे, दिनेश गिरमे, रत्नाकर फाटे, सतीश गवळी, रामभाऊ कसबे, दत्ता डूरे आदींसह कॉंग्रेस पदाधिाऱ्यांनी दिवसभर याठिकाणी उपस्थित राहून लाक्षणिक उपोषण केले.
सकाळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून उपोषणाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, कॉंग्रेस नेत्या प्रियांक गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ बाळासाहेब शिवरकर यांनी काही वेळ रास्ता रोको आंदोलन केले. संध्याकाळी चारच्या सुमारास उपोषण स्थगित करण्यात आले.