नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणातला गदारोळ संपला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दरम्यान, शरद पवार यांनी आज एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. आणि मोदींनी कोणतीही ऑफर दिली नसल्याचे स्पष्ट केले.
शरद पवार म्हणाले, सुप्रिया सुळे यांच्यासाठी पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळात कोणत्याही पदाची ऑफर दिली नव्हती, परंतु ते चांगले काम करत असल्याचे ते म्हणाले. याशिवाय राष्ट्रपतीपदाची बातमीही त्यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले की, राष्ट्रपतीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच राज्यातील सरकार आणि युती पूर्ण पाच वर्षे चालेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अजित पवार यांना उपमुख्यमंत्री बनविण्यासंदर्भात विचारले असतात याबाबत पक्ष निर्णय घेईल,असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. शिवसेनेशी युतीबाबत पवार म्हणाले की निवडणुका नंतरच या सर्व गोष्टी सुरू झाल्या. निवडणुकीपूर्वी शिवसेनेबरोबर युती करण्याचा त्यांनी कधीही विचार केला नव्हता. निवडणुकीनंतरच शिवसेनेशी चर्चा सुरू झाली. तसेच भाजपबरोबर काम करण्यापेक्षा शिवसेनेबरोबर काम करणे सोपे आहे.