पुणे – राज्यातील जिल्हा परिषदच्या 300 शाळा “आदर्श शाळा’ म्हणून विकसित होणार आहेत. भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता व प्रशासकीय बाबी या तीन टप्प्यांमध्ये त्या सर्वांगिण विकसित करण्याचे हाती घेण्यात येणार आहे. त्याबाबतचे सक्षम नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी होणार आहे.
मार्च 2020 मध्ये झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केल्यानुसार शालेय शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात काही शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय जाहीर केला होता. प्रत्येक तालुक्यातील एक अशा 300 शाळा निवडल्या आहेत.
यात पहिली ते सातवीच्या व गरज पडल्यास आठवीचे वर्ग जोडण्यास वाव असलेल्या शाळांची निवड करण्याबाबत शासनाकडून सूचना दिल्या होत्या.
जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शाळांची यादी अंतिम करण्यासाठी आदर्श शाळांच्या निकषांच्या आधारे पडताळणी करून त्यात काही बदल असल्यास 6 नोव्हेंबरपर्यंत त्याचा अहवाल सादर करणे आवश्यक आहे.