काँग्रेस पक्षाचे प्रमुख प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी निवडणूक आयोगावर हल्ला बोल केला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांचा वादग्रस्त व्यक्त्यांवर निवडणूक आयोगाने कठोर पावले न उचलण्याच्या आरोप त्यांनी ट्विटद्वारे केला आहे.
क्या MCC अब बन गया है –
‘Modi Code of Conduct’आदित्यनाथ भारतीय सेना का अपमान करते है – EC उन्हें ‘प्रेम पत्र’ लिखता है।
नीति आयोग VC न्याय योजना को कोसते हैं – EC कहता है ‘आगे से मत करें’।
चुनाव आयोग ‘सतासीन ताक़तों को सच्चाई का आईना’ दिखाने से घबरा क्यों रहा है? pic.twitter.com/SbSPe5SeEW
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) April 6, 2019
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय सेनेला मोदी सेना म्हटले असून भारतीय सेनेचा अवमान केला होता. तसेच नीती आयोगाचे उपाध्य राजीव कुमार यांनी न्याय योजनेला कोसले होते. या वादग्रस्त वक्त्यांवर काँग्रेस पक्षाचे प्रमुख प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटद्वारे केले की,” ‘क्या एमसीसी (मॉडल कोड ऑफ कंडक्ट) अब बन गया है – मोदी कोड ऑफ कंडक्ट.” असा दावा त्यांनी केला आहे. तसेच जेव्हा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भारतीय सेनेचा अवमान करतात तेव्हा निवडणूक आयोग त्यांना प्रेमपत्र लिहितात, तर दुसरीकडे जेव्हा नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार न्याय योजनेला कोसतात तेव्हा निवडणूक आयोग कुठलेही कठोर पाऊले न उचलता त्यांना यानंतर असे करू नका एवढेच सांगतात.